अमरावती : पर्यावरण राज्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इ-रिक्षाचे उदघाटन करण्यात आले. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी देशविकासाच्या अशा मॉडेल्सचे नेहमीच पुरस्कर्ते राहिले आहे. त्यांच्याच प्रेरणेने अमरावती जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यासाठी शहरात इ रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. ‘रिक्षा चालकांनी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या ऑटो रिक्षा ऐवजी इ-रिक्षाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केल्यास, इंधनही वाचेल व पर्यावरणाचा समतोलही राहील,’ असे मत पोटे पाटील यांनी व्यक्त केले.